त्याला फुटतात माया, ममत्व,प्रेम,जिव्हाळा
आपुलकी अशा अनंत पारंबी
आई नावाचा वटवृक्ष भूमीत उगवून आकाशाकडे झेपावला तरी,
भूमीशीच नाते सांगते पारंबी!
अगदी तसेच...
त्रिखंडात कितीही शोधली तरी
आई नावाच्या हा वटवृक्ष सापडायचाच नाही.
म्हणूनच," स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी "
असं म्हणता येते.
वैज्ञानिक संशोधनानुसार वृक्ष हे दिवसा ऑक्सीजन घेतात.रात्री कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन करतात.म्हणून रात्री वृक्षाखाली झोपू नये असे म्हणतात.
पण... वटवृक्ष हा एकच असा आहे की तो रात्री सुद्धा ऑक्सीजन(प्राणवायू) उत्सर्जित करतो.
तसेच आईचेही सांगता येईल,
ती बाळाच्या जन्मापासून ते आपल्या स्वतःच्या मृत्यू पर्यंत बाळासाठीच जगते.अगदी प्राणवायू बनून...
आईला सांभाळा! ती हरवली तर तिच्या रुपातील आपला प्राणवायू निघून जाऊ शकतो.
© पुष्पा पटेल " पुष्पम्"
म्हसावद.