ती वेळ होती खूपच छान
नव्हती आपल्याला कसली जाण
खेळताना पडावं,पडल्यावर रडावं
रडता रडता इकडं तिकडं हिरमुसून पहावं
उठावं ! पुन्हा रमावं...नसे हो भान
किती किती होती ती वेळ छान
जगण्यात आनंद होता
अन् कधी कधी आपण करायचो
एकमेकीत धुमशान !
तेव्हा आपल्यात व्हायची कट्टी !
दोन दिवस जात नाही
लगेच व्हायची पुन्हा बट्टी (मैत्री)
हे असं मस्त होतं आपलं जीवन
किती गोड गोड होतं न् सखींनो !
आपलं ते बालपण ...?
उत्तर एकच " अप्रतिम !"
© पुष्पा पटेल " पुष्पम् "