लेखकाचं जीवन म्हणजे...
वसंतात बहरलेला पुष्पपिसारा
नव्या पालवीचा प्रसन्न नजारा
निराश मनाला प्रेरक इशारा
कोरड्या मृदेला धुंदगंध देणारी
पहिल्या पावसाची धारा !
मरगळलेल्या विचारांना
उभारी देणारा वारा
आयुष्य सुंदर आहे ते आनंदाने जगावे!
हे सांगणारा महान नारा
नर अच्छा कर्म करे सो...
नारायण हो जाय!हा मंत्र घोष प्यारा
कधी शब्दांची करुनी फुले
सुगंधित करतो दुनिया
कधी शब्दांची करुनी शस्त्रे
दाखवी दुनिया बदलण्याची किमया!
कल्पनेचे लावून पंख
पाहतो दशदिशांची सृष्टी
जे न देखे रवि ते देखे लेखक कवी
लेखणीतून करतो शब्दमोत्यांची वृष्टी
साहित्याचा पदपथावर...चालतो
साहित्य शारदेचा होऊन पथिक
रामायण महाभारत गीता ग्रंथ...
कथा कविता कादंबरी लेखनातून पेरतो विचार नैतिक
बालगीतातून बागडतो...
आनंदाचा नंदनवणी
लेखकच जगतो होऊन
साहित्य सरितेचा धनी !
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"